Maharashtra new district and taluka नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मधील नवीन 81 तालुके आणि वीस जिल्ह्यांच्या बाबतीत ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत परंतु वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय कामाचा वाढता का आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता बऱ्याच काळापासून नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी होत आहे नव्या प्रस्तावित असलेल्या 22 नवीन जिल्ह्यांची आणि वाढीव 81 तालुक्यांची चर्चा सध्या राज्यस्तरावरती सुरू आहे तसेच प्रशासकीय सुलभता आणि सर्वसामान्यांची कामे वेगाने व्हावीत आणि यामागील मुख्य उद्देश साध्य व्हावा यासाठी खालील प्रस्तावित नवीन जिल्हे आणि त्या संबंधित सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर मित्रांनो महाराष्ट्र हे देशातील एक मोठं राज्य आहे काही जिल्हे भौगोलिक दृष्ट्या इतके मोठे आहेत की त्यांना जिल्ह्याच्या एका टोकाकडून मुख्यालयात पोहोचण्यासाठी नागरिकांना आठ ते दहा तास प्रवास करावा लागतो तसेच जिल्हा छोटा असल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अध्यक्ष प्रत्येक तालुक्यावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतात तसेच नवीन जिल्हा मिळाल्यास विकासासाठी स्वतंत्र निधी मिळतो आणि नवीन जिल्हा मुख्यालय झाल्यास तिथे नवीन कार्यालय रुग्णालय आणि बाजारपेठ तयार होतात.
नवीन 22 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे
तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधून माळेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार होणार आहेत तसेच ठाणे जिल्ह्यातून मेरा भाईंदर आणि कल्याण हे दोन नवीन जिल्हे तयार होताना दिसतील तसेच पालघर मधील जव्हार त्याचबरोबर अहिल्यानगर मधून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर पुण्यामधून बारामती जुन्नर सातारा जिल्ह्यातून कराड जिल्हा हा नव्याने तयार होईल तसेच रत्नागिरी मधून चिपळूण तर रायगड मधून महाड बीड मधून अंबाजोगाई तसेच लातूर मधून उदगीर तर नांदेड मधून गोकुंदा अर्थात किनवट तसेच जळगाव मधील चाळीसगाव आणि भुसावळ हे दोन जिल्हे तयार होतील तर यवतमाळ मधून पुसद अमरावती मधून अचलपूर आणि गडचिरोली मधून अहेरी तसेच बुलढाणा या जिल्ह्यातून खामगाव हा जिल्हा नवीन तयार होईल.
तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास त्यामधून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे जिल्हे नावीन्य निर्माण होतील कारण अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामुळे विशेषता शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते तसेच नाशिक जिल्ह्याचा विचार करता माळेगाव जिल्हा करण्याचे मागणी अनेक दशकापासून प्रलंबित आहे माळेगाव एक मोठे औद्योगिक शहर आहे तसेच जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी कलवन हा दुसरा जिल्हा प्रस्तावित आहे तसेच पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती ही एक मोठी बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र बनलेले आहे त्यामुळे बारामती जिल्ह्याची निर्मिती जवळपास निश्चित मानली जात आहे तर जुन्नर आंबेगाव परिसरासाठी जुन्नर जिल्हा प्रस्तावित आहे तसेच ठाणे आणि पालघर चा विचार करता मुंबईला लागून असलेल्या भागात लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली या भागांसाठी स्वातंत्र जिल्हा प्रशासनाची गरज सतत भासत आहे.
81 नवीन तालुक्यांची निर्मिती खालील प्रमाणे
तर मित्रांनो जिल्हा प्रमाणेच अनेक मोठे तालुके आहेत जिथे लोकसंख्या पाच लाखांच्या वर गेलेली आहे अशा ठिकाणी कामाचा लोड कमी करण्यासाठी नवीन 81 तालुके निर्माण करण्याचे नियोजन सध्या सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल या भागातील नवीन तालुके होऊ शकतात गडचिरोली आणि यवतमाळ मधील दुर्गम भागात नवीन तालुके होऊ शकतात तसेच मराठवाड्याचा विचार करता बीड आणि नांदेड मधील मोठ्या तालुक्यांची विभाजन प्रस्तावित आहे तर कोकण या प्रशासकीय विभागात दुर्गम डोंगर भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नवीन तालुका केंद्राची गरज सतत भासताना दिसून येत आहेत.
तर मित्रांनो जर नवीन जिल्ह्याची मागणी होत असली तरी सरकार समोर काही महत्त्वाची आव्हाने असतात जसे की आर्थिक बोजा कर्मचारी भरती सीमावाद तर मित्रांनो आर्थिक बोजाच्या बाबतीत जर पाहिला गेला तर एका नव्या जिल्ह्याची निर्मितीसाठी किमान 1500 ते 2000 कोटी रुपयांचा खर्च येतो या जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिषद असेल पोलीस मुख्यालय असेल आणि इतर प्रशासकी इमारतीचा समावेश देखील यामध्ये करण्यात येतो तसेच कर्मचारी भरती बद्दल जर माहिती घ्यायची झाली तर नवीन जिल्ह्यासाठी हजारो नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते ज्यामुळे सरकारी व्यक्ती पगारांचा मोठा भार पडेल आणि सीमावाद या प्रश्नांचा विचार केला तर कोणत्या तालुक्याला कोणत्या जिल्ह्यात समाविष्ट करायचे यावरून अनेकदा स्थानिक राजकारण आणि वाद उद्भवतात.
नागरिकांना होणारे फायदे
तर मित्रांनो नागरिकांना याच्यामध्ये खूप फायदा आहे जसे की वेळेची बचत शिक्षण आणि आरोग्य तसेच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील तर वेळेची बचत विचार केला तर जिल्हा मुख्यालय जवळ आल्यामुळे सरकारी कामांसाठी होणारा प्रवास कमी होईल आणि लवकरात लवकर कामे होतील तसेच शिक्षण आणि आरोग्य सुविधा बद्दलची माहिती घेतली तर नवीन जिल्हा रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय निर्माण होतील तसेच कायदा व सुव्यवस्था स्वतंत्र पोलीस मुख्यालय असल्यामुळे गुन्हेगाडीवरती नियंत्रण मिळवणे सोपे होईल आणि कायदा व सुव्यवस्था ठीक राहील.
तर मित्रांनो महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या आणि विकासाचा समतोल टाकण्यासाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती ही काळाची गरज आहे जरी यामुळे सरकारी तिजोरीवर ताण येणार असला तरी दीर्घकालीन विकासासाठी ही पाऊल फायदेशीर ठरेल तसेच शासन स्तरावर ती सध्या या प्रस्तावाची छाननी सुरू असून आगामी काळात टप्प्याटप्प्याने या जिल्ह्यांची व तालुक्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे